पुणे

धामणीतील नऊ उपसा सिंचन योजना अडचणीत

CD

पारगाव, ता. ८ : दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणी (ता. आंबेगाव) परिसरात सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या आहेत. राज्य सरकारने शेती पंपाच्या नवीन धोरणातून दुष्काळी गावांना वगळून तातडीने नवीन वीज जोड द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

धामणीतील शेतकरी एकत्र येत लाखो रुपये खर्च करून सामुदायिक उपसा सिंचन योजना राबवण्यास सुरुवात केली. मात्र, राज्यात यापुढे शेतीपंपासाठी नवीन वीज जोड देणे बंद केले असून, सोलरवर शेतीपंप चालवावा, असे शासकीय धोरण निच्छित केले आहे. परंतु जास्त अश्वशक्तीच्या शेतीपंपासाठी सोलर यंत्रणा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करणे अवघड असून, त्यासाठी जास्त खर्च येणार आहे. यामुळे उपसा योजना अडचणीत आल्या आहेत.

दुष्काळी गावाचा शिक्का पुसण्यासाठी धामणीतील शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक मळ्यातील शेतकऱ्यांनी अधिका-अधिक शेतकरी एकत्र आले आहेत. शासनाच्या कोणत्याही मदतीची वाट न पाहता गावजवळनूच बढेकरमळा परिसरातून जात असलेल्या डिंभे धरणाचा उजव्या कालव्यावर सिंचन योजना राबवून जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी नेण्यासाठी लोकवर्गणी तसेच बँक, पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून सामुदायिक सिंचन योजना करण्याचा निर्णय घेतला होता. दोन आठवड्यापूर्वी एकूण नऊ उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली एका सिंचन योजनेसाठी एकूण ४० ते ५० लाख रुपये खर्च येत आहे. या सर्व सिंचन योजनेचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी नवीन उपसा सिंचन योजनांच्या रोहित्रासाठी लागणारा निधी उपलब्ध करून शासनाच्या विविध विभागाकडून लागणारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार शेतीपंपाना नवीन वीज जोड देणे बंद केल्याने या सर्व उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या आहे.


माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी धामणी गावातील या सर्व उपसा सिंचन योजनांच्या साठी वीज जोड मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नवीन वीज जोड न मिळाल्यास लाखो रुपये खर्च करून तयार झालेल्या या उपसा सिंचन योजना अडचणीत येतील.
- रवींद्र करंजखेले, माजी पंचायत समिती सदस्य
05571

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT