पारगाव, ता. ८ : शिरदाळे (ता. आंबेगाव) परिसरात सततच्या पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. पेरणी केलेले सोयाबीन, वाटाणा, मका, उडीद, मूग आणि काही प्रमाणात बटाटा ही पिके पूर्णपणे पाण्याने सडून गेली आहेत. त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
चालूवर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे चांगला पाऊस झाल्याने वेळेपूर्वीच पेरणी झाली होती. तसेच निम्याहून अधिक क्षेत्रात पावसाळी बटाटा लागवड झाली होती. परंतु सतत दोन महिने पाऊस सुरू असल्याने पिकांना सूर्यप्रकाश न मिळाल्याने आणि सतत ओलेपणा असल्याने ही सर्व पिके शेतात सडायला लागली आहेत. लागवड करण्यासाठी आणलेले बऱ्याच शेतकऱ्यांचे बटाटे घरातच पडून आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे की बियाणे खते घरात पडून आहेत. त्यामुळे यावर्षी जास्त पाऊस होऊन देखील मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर निर्माण झाले आहे.
पेरणी केलेली सर्व पिके पाण्यात सडून गेली असून, पिकांचा कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच सुप्रिया तांबे, उपसरपंच बिपिन चौधरी, माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी केली आहे.
05814
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.