भिगवण, ता. २१ः ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. परंतु विशिष्ट प्रशिक्षणाअभावी हे विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये मागे राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एमएच सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट प्रशिक्षणाची गरज आहे,’’ असे मत आयआयटी बझ संस्थेचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांनी व्यक्त केले. येथील विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल व आयआयटी बझ यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात परब बोलत होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजयराव थोरात, प्राचार्या वंदना थोरात, डॉ. काशिनाथ सोलनकर आदी उपस्थित होते. याबाबत संस्थेचे अध्यक्ष थोरात म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील मुलांना बाहेर शिक्षणासाठी आर्थिक, तसेच इतर कारणांमुळे जाता येत नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण निश्चित उपयुक्त ठरणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’’ कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठलराव थोरात स्कूलच्या शिक्षकांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.