भोर, ता. २५ : पावसामुळे ब्रिटिशकालीन भाटघर धरणात शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार-पाच दिवसांमध्ये धरण १०० टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धरणातील पाणीसाठ्यात बुधवारपासून सुरू झालेल्या पावसामुळेमोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणात शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी चार वाजेपर्तंय ९१.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
भाटघर धरणाच्या दरवाज्यांच्या फटीतून पाणी पडण्यास सुरुवात झाल्याने परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात केवळ ६७ टक्के पाणीसाठा होता. नीरा धरण साखळीतील नीरा-देवघर, गुंजवणी आणि वीर या धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. नीरा धरण साखळीतील सर्वाधिक २२.७४ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या भाटघर धरणात १५ जुलैला ९१.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील ११.९२ टीएमसी पाणीसाठा असलेल्या नीरा-देवघर धरणात ७७.८५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हा ६० टक्के होता. तर राजगड तालुक्यातील ३.७ टीएमसी पाणीसाठा असलेल्या गुंजवणी धरणात ७१ टक्के पाणीसाठा आहे. या तीनही धरणांमधील पाणी वीर धरणात जात आहे. वीर धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असूनही धरणात ८६.५७ टक्के पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यःस्थिती भाटघर, नीरा-देवघर आणि वीर धरणातून विसर्ग सुरू नाही.
यावर्षी भाटघर धरण खोऱ्यातील भूतोंडे परिसरात सर्वाधिक २ हजार ८३९ मिलिमीटर पाऊस पडला असून त्याखालोखाल कुरुंजी येथे २ हजार ६६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नीरा-देवघर धरण खो-यातील शिरगाव येथे २ हजार ४६५ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. फोटो पाठविला आहेkik25p1-
05532
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.