पुणे

चाकणमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल

CD

चाकण, ता. ६ : येथील औद्योगिक वसाहतीतील बिंद्रा इंडस्ट्रीज कंपनीत लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षांपूर्वी अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित ठेकेदार विशाल सोनावणे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला.
बिंद्रा इंडस्ट्रीज कंपनीत लिफ्टसाठी ठेकेदार आरोपीने कंपनीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम चालू केले. तिथे लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्याला कंपाउंड अगर आडोसा केला नाही. तेथील सोनू सिरसवाल या सुरक्षारक्षकाच्या अडीच वर्षांच्या तापसी या मुलीचा १७ जुलै २०२२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या खड्ड्यात पडून बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यू, अशी पोलीस दप्तरी नोंद केली होती. याप्रकरणी तक्रारी अर्ज आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठेकेदार आरोपी विशाल सोनावणे याच्यावर गुन्हा दाखल केला, अशी माहिती महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडीक यांनी दिली. याप्रकरणी पोलिसात फिर्याद महाळुंगे पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश उदेसिंग गुमाने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Update: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ठप्प, खंबाटकी घाटातही वाहनांची लांबलचक रांग! बातमी वाचा नाहीतर सुट्टी ट्रॅफिकमध्ये जाईल

Latest Marathi News Live Updates : अंबाझरी तलावाच्या मध्यभागी जाऊन ध्वजारोहण करत जलतरणपटूनी केला वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा

Hindu Khatik Samaj Protests : हिंदू खाटीक समाजाचं कल्याण महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन, कोंबडी आणत पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा केला विरोध...

Hingoli Politics: हिंगोली महायुतीत संतोष बांगर व गजानन घुगे यांच्यात आरोपांचा शीतयुद्ध; महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता

Independence Day 2025: भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशाचं स्वरूप कसं असतं?

SCROLL FOR NEXT