पुणे

चाकणची कोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमण हटविणार

CD

चाकण, ता. १६ : ‘‘पुणे- नाशिक, चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर, तसेच चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामगार, नागरिक सारे त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी नवीन मार्ग होणे अपेक्षित आहे. नवीन मार्ग होण्यासाठी या मार्गावरील अतिक्रमणे पीएमआरडीए, चाकण नगरपरिषद व संबंधित विभागाकडून संयुक्त कारवाई करून काढून टाकण्यात येणार आहे. ही कारवाई १ सप्टेंबरपासून सुरू होईल,’’ अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सकाळशी बोलताना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी चाकण (ता. खेड) येथे प्रत्यक्ष वाहतूक कोंडी पाहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संबंधित विभागांची बैठकही घेतली. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी तसेच, नवीन मार्ग होण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे ॲक्शन मोडवर आहेत. तळेगाव- चाकण, चाकण- शिक्रापूर मार्गाचे काम होण्यासाठी त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीची पाहणी करताना मोबाईलवरून संपर्क साधून सूचना दिल्या.
पुणे- नाशिक मार्गाच्या कामाची निविदाही येत्या २५ सप्टेंबरला खुली करण्यात येणार आहे. राज्य सरकार पुणे- नाशिक महामार्गाचे राहिलेले सात टक्के भूसंपादन करून देणार आहे. महामार्गाचे काम होत असताना भूमी संपादन पीएमआरडीएचे संपादन मंडळ करणार आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

रस्त्याची रुंदी वाढणार
या रस्त्यावरील अतिक्रमणे चिंबळी फाटा ते चांडोली दरम्यान काढण्यात येणार आहेत. पुणे- नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, तसेच चाकण शहरातील माणिक चौक यांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. पुणे- नाशिक महामार्गावरील मोई फाटा, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, मुटकेवाडी फाटा या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत व चौकाची रुंदी वाढविण्यात येणार आहे.

अतिक्रमणांवर लक्ष देण्याची गरज
या मार्गाची कामे सुरू करायची असेल तर प्रथमतः पर्यायी रस्ते तयार केले पाहिजेत. त्यामुळे प्रशासनाने सध्या अतिक्रमणे काढून पर्यायी रस्ते करण्यावर भर दिला आहे. सध्या जे मार्ग अस्तित्वात आहेत ते मार्ग अगदी १० ते २० फूट रुंदीचे झालेले आहेत. त्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यात अवैध वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त वाहन चालक यांचाही वाहतूक कोंडीत मोठा प्रभाव आहे. हातगाडी वाले, पथारीवाले व इतर व्यावसायिक अतिक्रमण करून रस्त्यावर बसतात, त्यामुळे वाहनांना ये- जा करण्यास अडथळा होतो. याकडे प्रशासनाने पहिले लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व आंदोलन कर्ते बाळासाहेब नाणेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT