चास, ता.३० : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर, भोरगिरी, टोकावडे, डेहणे परिसरातील भातासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देवून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक विठ्ठल वनघरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, यंदा पेरणीपूर्व मशागती होण्यापूर्वीच पावसाने जोरदार आगमन केले होते. त्यातच भातरोपे तयार करण्यापासून लागवडीपूर्वीच पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे चित्र बिघडवले होते. भातपिकाच्या वाढीत पिकावर, कीड, करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच पुन्हा मुसळधार पावसाने बांध फुटणे, भातपिके वाहून जाणे, असे घडले असून खरिपातील अन्य पिकांचीही स्थिती तीच आहे. तातडीने या भागातील पिकांची पाहणी करून पंचनामे करण्यात येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागणीचे निवेदन पश्चिम पट्याच्या वतीने चंद्रकांत भालेराव, कुंडलिक कोहिणकर, शंकर मोरमारे, संतोष भांगे, दीपक आढळ, डॅा. कुणाल नांगरे, मारुती वाघचौरे आदींनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
दिले आहे. दरम्यान, तहसीलदार बेडसे यांनी सांगितले की पाऊस थांबताच कृषी विभागाला बरोबर घेऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करणार असून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.