पुणे

बिबट समस्येबाबत सरकारची उदासीनता

CD

खोडद, ता. १९ : जुन्नर वनविभागासह संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांची समस्या निर्माण झाली आहे. बिबट्यांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्य सरकार अजूनही कोणतीच ठोस पावले उचलताना दिसत नाही. बिबट समस्येबाबत राज्य सरकारची उदासीनता आणि कुचकामी ठरत असलेल्या उपाययोजना यामुळे बिबट समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे.
मागील २५ वर्षांत (२००० ते २०२५) जुन्नर वनविभागात बिबट्यांच्या हल्ल्यात विविध गावांमध्ये एकूण ५६ नागरिकांचा जीव गेला आहे. २००० ते २०१८ या १८ वर्षांत (२३ जानेवारी २०१८ पर्यंत) २९ जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे तर २०१८ ते २०२५ या अवघ्या ७ वर्षांत २७ जणांचा बिबट्यांच्या हल्ल्यात विविध गावांमध्ये मृत्यू झाला आहे. यावरून सुरुवातीच्या १८ वर्षांत झालेल्या मृत्यूपेक्षा शेवटच्या ७ वर्षांत झालेले मृत्यू हे अधिक आहेत हे लक्षात येईल. अवघ्या ७ वर्षांत २७ जणांचा मृत्यू झाला असून, या २७ जणांमध्ये १३ पुरुष आणि १४ महिला आहेत, ही गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणावी लागेल.

वनपरिक्षेत्रनिहाय २०१८ ते २०२५ या कालावधीतील घटना
वनपरिक्षेत्र***मृत्यूंची संख्या
शिरूर**१२
ओतूर**८
जुन्नर**३
खेड**४
एकूण***२७

बिबट्यांची संख्या अनियंत्रित का होते
जुन्नर तालुक्यात ५००, शिरूर तालुक्यात ५००, खेड तालुक्यात १०० तर आंबेगाव तालुक्यात २०० असे जुन्नर वनविभागात सुमारे १३०० बिबटे आहेत. यापैकी ५० टक्के नर व ५० टक्के माद्या आहेत असे गृहीत धरले तरी ६५० माद्या असतील, यापैकी बछड्यांना जन्माला घालण्याची क्षमता ६५० पैकी ४०० बिबट माद्या असे मानल्यास आणि एक मादी एका वेळेला कमीत कमी ३ बछड्यांना जन्माला घालू शकते, म्हणजे दोन वर्षात १२०० नवीन बिबट्यांची वाढ होत आहे, हे भयानक वास्तव लक्षात घ्यायला हवे. एक मादी दर दोन वर्षांनी बछड्यांना जन्म देते.पूर्वी मादी दोन किंवा तीन बछड्यांना जन्म द्यायची पण अलीकडच्या काळात या भागातील अधिक पोषक वातावरणामुळे ती चार बछड्यांना जन्म देऊ लागली आहे, विशेष म्हणजे चारही बछडे सुखरूपपणे जगत आहेत. बछडे जन्मल्यानंतर ते बछडे दोन वर्षे आईसोबतच राहतात व नंतर शिकार करण्यासाठी सक्षम झाल्यानंतर ते आईपासून विभक्त होतात, यानंतर ती बिबट मादी पुन्हा बछड्यांना जन्माला घालते. बिबट मादीला १०५ दिवसांची गर्भधारणा असते.

...अन्यथा समस्या हाताबाहेर जाईल
आतापर्यंत बिबट्यांकडून झालेल्या मानवी हल्ल्यांच्या घटनांचा बारकाईने विचार केला तर एक बाब लक्षात येते, ती म्हणजे बिबट्यांच्या झालेल्या हल्ल्यांपैकी ५० टक्के हल्ले हे लहान मुलांवर झाले आहेत. शासनाने बिबट्यांकडून होणाऱ्या मानवी हल्ल्यांचा विचार करून बिबट्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा पुढील तीन वर्षांत जुन्नर वनविभाग आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी बिबट समस्या हाताबाहेर गेलेली असेल.

बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास संपला आहे. सध्याचा बिबट्यांचा उसामधील अधिवास हा नैसर्गिक अधिवास नाही. शासन चराई बंदी, वृक्षतोड बंदी करून जंगले सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सहकार्यातून बिबट्यांचा हा नैसर्गिक अधिवास तयार करण्यासाठी मदत होईल. बिबट्यांच्या समस्येचे निर्मूलन होईपर्यंत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून स्वतःची, लहान मुलांची व वृद्धांची काळजी घ्यावी.
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT