पुणे

पिकांची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

CD

पळसदेव, ता. १ : सोलापूर जिल्ह्यातील शेती सिंचनाबरोबर इतर पाणी योजनांसाठी आवर्तन सुरु असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पिकांची वाढलेली तहान भागविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. पाणी पातळी दुरावत असल्याने विद्युत पंप हलविणे, पाइप व केबल वाढविण्याचे वाढीव काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे.
सध्या उजनी धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोचला आहे. यामध्ये मृत पाणीसाठ्यातील ६४ टीएमसी साठा वगळता उपयुक्त पाणीसाठा केवळ १३ टीएमसी आहे. यातच गाळाचे प्रमाण ५ टीएमसीहून अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जातो. तर याच पाण्यातून सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी मुख्य कालव्यातून २ हजार ९५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय बोगदा, सीना- माढा योजना, दहिगाव योजनेसाठी पाणी सोडणे सुरु आहे. येत्या आठ- दहा दिवसांत सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीतून पाणी सोडले जाईल. त्यामुळे उजनी धरण या महिनाअखेरपर्यंत मृत साठ्यात प्रवेश करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
आगामी उन्हाळ्यातील दोन महिने व पावसाळ्यात धरणात पाणीसाठा येईपर्यंतचे दोन महिने असे चार महिने पाणी पुरेल, याबाबत कोणतेच नियोजन नसल्याचा आरोप धरणग्रस्त शेतकरी करत आहेत. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांनाच पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत धरणग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. एकीकडे पिकांना पाणी देण्यासाठी सुरु असलेली शेतकऱ्यांची कसरत व दुसरीकडे सतत खंडित होणारा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ याप्रमाणे ठरत आहे. त्यामुळे केवळ धरणाच्या जिवावर अवलंबून असलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


उजनी धरणातील शिल्लक पाणीसाठा -दृष्टीक्षेपात
- शिल्लक पाणीसाठा- २५ टक्के
- मृत पाणीसाठा- ६४ टीएमसी
- उपयुक्त पाणीसाठा- १३ टीएमसी
- सोलापूरसाठी आवर्तन- २ हजार ९५० क्यूसेक

सोलापूरप्रमाणे पुणे जिल्ह्यातील अनेक पाणी योजना उजनीवर अवलंबून असल्याच्या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. उजनीतून बेकायदेशीरपणे नदीत पाणी सोडले जाते. पालकमंत्री, जलसंपदा मंत्री याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. धरणग्रस्तांची एकजूट नसल्याची बाब सोलापूरकरांच्या पथ्यावर पडत आहे. मात्र, उजनीसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचा प्रपंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब विचारात घेऊन उजनीतील मृतसाठ्यातील पाण्याला हात न लावता केवळ उपयुक्त साठ्यातील पाण्याचे वाटप करण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. उजनीच्या मूळ आराखड्यानुसार धरणग्रस्तांच्या वाटणीचे पाणी राखीव ठेवावे. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात धरणग्रस्तांना यामुळे टंचाईचा सामना करावा लागत आहे.
- भूषण काळे, संचालक, कर्मयोगी साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT