काटेवाडी, ता. २२ : नाझरे धरणातील पाणीसाठा रविवारी (ता.२२) ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत धरण पूर्ण क्षमतेने (६७७.०२ मीटर) भरेल. धरणात सध्या पाण्याची आवक सुरू असून, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार स्वयंचलित द्वारांद्वारे कऱ्हा नदीत पाण्याचा विसर्ग लवकरच सुरू होऊ शकतो, अशी माहिती नाझरे धरण पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
नाझरे धरणातून सोडलेले पाणी बारामती तालुक्यातील जिराईत पट्ट्यापासून ते बारामती शहरापर्यंत कऱ्हा नदीमार्गे पोहोते. तसेच, सोनगाव येथे कऱ्हा नदी नीरा नदीला मिळते, त्यामुळे या भागातील नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः बारामती तालुक्यातील कऱ्हा आणि नीरा नदीकाठच्या गावांनी अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नाझरे येथील धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नागरिकांनी कऱ्हा नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेली जनावरे, साहित्य किंवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्याच आधारे कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाचे निर्देश:
बारामती तालुक्यातील कऱ्हा आणि नीरा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
पूरस्थिती टाळण्यासाठी नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत नाझरे धरण पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.