drought  sakal
पुणे

Drought News : दौंड तालुक्याला दुष्काळाच्या झळा

कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटणार एकट्या दौंड तालुक्यामध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते.

सकाळ वृत्तसेवा

खुटबाव, ता.१८ : पावसाने दांडी मारल्याने दौंड तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याअभावी जिरायतीसह बागायती भागातील पिकांना मोठा फटका बसत आहे. पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा मुठा व भीमा नदीला यावर्षी एकदाही पूर न आल्याने तालुक्यातील शेतकरी लांबलेल्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

लांबलेल्या पावसाने मुळा मुठा व भीमा नदीचे पाणी पातळी कमी झाल्याने शेतकरी आपल्या विद्युत पंपापासून शेतीला पाणी पुरावे म्हणून पाइप नदीपात्रामध्ये लांबवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी नदीला पूर येत असल्यामुळे दोन-तीन महिने नदीपट्ट्यातील विद्युत पंप हे पाइपपासून वेगळे करून सुरक्षित ठिकाणी ठेवले जातात. पावसाच्या पाण्यामुळे शेतीला पाण्याची गरज पडत नाही.

मात्र यावर्षी शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्याची वेळ आलीच नाही. याउलट ऐन पावसाळ्यामध्ये दिवसभर ऊन पडत असल्याने तीव्र उन्हाळ्याचा झळा जाणवत आहेत. भरीस भर म्हणून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतातील पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. दौंड तालुक्यात या वर्षी १४,८२० हेक्टर उसाची लागवड झाल्याचे दौंड तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी सांगितले.

कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटणार एकट्या दौंड तालुक्यामध्ये दरवर्षी ५० लाख टन उसाचे उत्पादन होते. यावर्षी कमी पावसामुळे उत्पादन घटणार आहे. परंतु पाऊस न झाल्याने आतापासूनच या उभ्या ऊस पिकाला जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली आहे. दरवर्षी दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे ऐन पावसाळ्यात बंद असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर ही गुऱ्हाळे सुरू होतात. यावर्षी पाऊसच नसल्याने खंड न पडता गुऱ्हाळे चालू आहेत.

तालुक्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच पावसाने पाठ फिरवली आहे. गेली दोन महिने पाऊस आला नसला तरी आगामी गणेशोत्सवामध्ये आम्हा शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे. ''देर से आये पर दुरुस्त आए'' या उक्तीप्रमाणे पाऊस येईल व शेतकऱ्यांचे समाधान करेल, अशी अपेक्षा आहे.
- संतोष थोरात, प्रगतशील शेतकरी, खुटबाव

गो शाळेत गाई दाखल करण्याची वेळ
पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाई सांभाळण्यासाठी चौफुला (ता.दौंड) येथील बोरमलनाथ गो शाळेला दिल्याची माहिती गो शाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी दिली. यापूर्वी भटक्या गायी गो शाळेत दाखल केल्या जायच्या. या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाई गो शाळेत दाखल होत असल्याने दुष्काळाचे विदारक चित्र ग्रामीण भागामध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT