पुणे

घोड नदीत बुडून बहिणींचा मृत्यू

CD

मंचर, ता. १ : बांद्रा-मुंबईहून उन्हाळ्याच्या सुटीसाठी एकलहरे (ता. आंबेगाव) येथे मावशीकडे आलेल्या आरती श्याम खंडागळे (वय १८) व प्रीती श्याम खंडागळे (वय १७) या दोन सख्ख्या बहिणींचा नात्यातील बारा वर्षीय मुलीचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात घोड नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी (ता. १) दुपारी घडली.
आरती ही बांद्रा येथे महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात व प्रीती ही इयत्ता बारावीत शिकत होती. त्या एकलहरे येथे मावशीच्या घरी दहा दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्या गुरुवारी दुपारी घोड नदीच्या काठावर गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत कावेरी आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे याही गेल्या होत्या. त्यावेळी कावेरी हिचा पाय सटकून ती नदीच्या पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती व प्रीती या पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघी पाण्यात बुडाल्या. यावेळी पाय घसरून पडलेली कावेरी हिचा जीव वाचला. वर्षा व कुशा यासुद्धा पाण्यात उतरल्या होत्या. पण, भीतीने त्या माघारी फिरल्या.
दरम्यान, तेथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष डोके, उपसरपंच दीपक डोके, पोलिस पाटील निखिल गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके, दीपक जाधव, अक्षय धोत्रे हे तातडीने मदतीसाठी आले. पाण्यात बुडालेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढून गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्या दोघींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT