हिर्डोशी, ता.२४ : मुंबईत हक्काची घरे मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. १० मार्चला आझाद मैदानावर मोर्चा काढल्यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास १ मेला मुंबईत ''आरपार''चे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गिरणी कामगार नेते कॉ. उदय भट यांनी दिला आहे.
भोर येथील श्रमिक हॉलमध्ये मंगळवारी (ता. २४) मुंबई गिरणी कामगारांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी कॉ. उदय भट, कॉ. दत्तात्रेय अत्याळकर, कॉ.विठ्ठल करंजे, कॉ. अनंत मालप, कॉ. विठ्ठल टापरे, कॉ. काका जगताप यांनी मार्गदर्शन केले. मुंबईला मोर्चासाठी जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गिरणी कामगार उपस्थित होते. भट म्हणाले की, मुंबईबाहेर घरे देण्याचे सरकारचे धोरण आम्ही हाणून पाडले आहे. मुंबईत जमिनी उपलब्ध असतानाही कामगारांना डावलले जात आहे. आता १४ संघटना एकत्र आल्या असून, विधिमंडळ अधिवेशनावर १० मार्चला गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतच पुनर्वसन जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांतून कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या सभेत मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.