पुणे

तणनाशकामुळे द्राक्षबागेला तीन लाखांचा फटका

CD

नारायणगाव, ता.१६: उसाच्या शेतात तणनाशक फवारल्यामुळे उसाच्या शेता शेजारील द्राक्ष बागेतील वेलीचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला आहे. ही घटना होऊन नऊ दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र अद्याप कृषी अधिकारी अथवा त्यांचा कोणताही प्रतिनिधी द्राक्ष बागेला भेट देण्यासाठी आला नाही, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप वारुळे यांनी दिले.

द्राक्ष उत्पादक वारुळे म्हणाले, की कृषी अधिकाऱ्यांच्या लाल फितीच्या कारभाराला शेतकरी कंटाळले आहेत. नारायणगाव येथील पाटे -खैरे मळा शिवारात गट क्रमांक ३५८ /१ मधील सामायिक क्षेत्रात नितीन आडसरे यांचा ऊस आहे. उर्वरित दोन एकर क्षेत्रात मागील वर्षी क्रीमसन या जातीच्या द्राक्षाच्या वेलींची लागवड मी केली आहे. ७ जून २०२५ रोजी नितीन आडसरे यांनी उसातील तण नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली होती. तणनाशकाचा दुष्परिणाम होऊन दोन एकर क्षेत्रातील क्रीमसन या जातीच्या १ हजार १२० द्राक्ष वेलींची पाने करपून गेली आहेत. यामुळे द्राक्ष वेलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षाचा पुढील हंगाम वाया जाणार आहे. द्राक्ष बागेची फवारणी करून करपलेल्या वेलींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी मदत करावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी आपण नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार द्या. पोलिस ठाण्याचे पत्र मला द्या. त्यानंतर मी द्राक्ष बागेला भेट देतो. असा सल्ला तालुका कृषी अधिकारी भोसले यांनी दिला. त्यानंतर नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याबाबतचे पत्र तालुका कृषी अधिकारी भोसले यांना पाठवले. त्यानंतरही अद्याप तालुका कृषी अधिकारी भोसले अथवा त्यांच्या कोणत्याही प्रतिनिधीने द्राक्ष बागेला भेट दिली नाही. याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे.

तननाशकाचे द्राक्ष वेलीवर दुष्परिणाम होतात. वर्षभरात योगेश सावंत, विलास पाटे, जगन मेहेत्रे त्यानंतर आता संदीप वारुळे यांच्या द्राक्ष वेलींचे तणनाशकामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतच्या तक्रारी तालुका कृषी कार्यालयात देण्यात आल्या आहेत. द्राक्ष बागे शेजारील परिसरात तणनाशक फवारणी करू नये. अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी कृषी विभागाकडे केली होती. मात्र अद्याप कृषी विभागाने कोणतीही दखल घेतली नाही.
- अवधूत बारवे (द्राक्ष उत्पादक शेतकरी)

द्राक्ष उत्पादक संदीप वारुळे यांनी माझ्याकडे तक्रार केली होती. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार रजेवर असल्याने पोलिस ठाण्याचाचा अहवाल माझ्याकडे अद्याप आला नाही. यामुळे मी द्राक्ष बागेला भेट दिली नाही. शासकीय प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने नुकसान झालेल्या द्राक्ष वेलींच्या नमुन्याची तपासणी शेतकऱ्याने खासगी प्रयोग शाळेत जाऊन स्वतः करावी. त्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्याने करावा.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी
06717

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT