न्हावरे, ता. २९ : मे महिन्यांत चार दिवस पडलेल्या पावसामुळे न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील चासकमानच्या चाऱ्यांमधून पाणी वाहू लागले आहे. धरणामधून कालव्याला पाणी न सोडता व ऐन उन्हाळ्यात चाऱ्यांमधून पाणी वाहू लागल्यामुळे निसर्गाच्या मनात आलं तर काही होऊ शकते, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
या परिसरातील न्हावरे, निमोणे, गुनाट, निर्वी, कोळगाव डोळस, उरळगाव, आंधळगाव या भागाला धरणातील पाण्याचा फायदा होतो. हा भाग टेलकडे असल्यामुळे पाणी मिळवण्यासाठी कायमच शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. मागील वर्षी मार्च महिन्यातच पाण्याचे आवर्तन येऊन गेले. त्यामध्ये काही गावातील चाऱ्यांना कमी प्रमाणात पाणी मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. धरणातील पाणी संपल्यामुळे एक महिन्यापूर्वीच उन्हाळी आवर्तन बंद झाले होते. लाभधारक शेतकरी जून- जुलैच्या पावसाची वाट पाहत असतानाच अचानक मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. सलग चार दिवस मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे-नाले, विहिरी, बोअरवेल, बंधारे भरून वाहू लागले आहेत.
मात्र पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे, तर नवीन ऊस लागवड पाण्यातच आहे. भुईमूगही पाण्यात सडू लागला आहे. नुकताच पाऊस उघडला असला तरी वाफसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.