निरगुडसर, ता. २८ : रांजणी, वळती, भागडी (ता. आंबेगाव) या गावांतील वनविभागाच्या हद्दीत असलेले जंगलातील तीन पाणवठे कोरडे पडल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच वनविभागाने तीनही पाणवठ्यात पाणी सोडले आहे. यामुळे पक्ष्यांची तहान भागणार आहे.
वळती (ता.आंबेगाव) येथील वनपरिमंडळात पाच पाणवठे वनविभागाकडून उभारण्यात आले आहे. ते कोरडे पडल्याने पशुपक्ष्यांचे हाल होत होते. याबाबत पशुप्रेमींनी या कोरड्या पडलेल्या पाणवठ्यात पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. याबाबतचे वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध झाले. या वृत्तामुळे दखल घेत वनविभागाकडून पाणवठ्यात पाणी सोडण्यात आले. यामुळे परिसरात वावरणारे मोर, लांडगे, कोल्हे, तरस बिबटे, ससे, चिमणी, कावळे आदी पशुपक्षांची तहान भागणार असल्यामुळे दिलासा मिळणार आहे.
03230
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.