फुलवडे ता. २९ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी, आहुपे, पाटण व भीमाशंकर खोऱ्यात शनिवार व रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आहुपे परिसरात सोमवारी देखील पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. भात खाचरांचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
भात पिकाच्या नुकसानी बरोबरच शेतातील माती देखील वाहून गेल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.” अशी मागणी जांभोरी येथील नुकसानग्रस्त शेतकरी हारकू केंगले, कोंडीबा पोटे, मेघोली येथील शेतकरी लक्ष्मण शेंगाळे, शशिकांत शेंगाळे, लक्ष्मण शेंगाळे, मारुती शेंगाळे, पोलीस पाटील बाळासाहेब शेंगाळे यांनी केली आहे.
इथून पुढील काळात अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिला तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे. आदिवासी भागात कोरडवाहू शेतकरी एकमेव वर्षभर या भात पिकांवर मेहनत घेत असतो. त्यांचे सर्व कष्ट वाया जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- विकास पोटे, शेतकरी, जांभोरी
04475
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.