पिरंगुट, ता. २० : मुळशी तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांत पाणी तुंबल्याने रोपे पिवळी पडू लागली आहेत. सततच्या पावसाच्या पाण्यात पेरलेले बी बुडून गेल्याने रोपे उगवलीच नाहीत.
मुळशीत सुमारे पन्नास टक्के शेतकऱ्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे. दुबार पेरणीनंतरही पावसाची उघडीप मिळेल की नाही याची साशंकता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पौड येथील तहसील कार्यालयाकडील माहितीनुसार, यावर्षी मुळशीत एक जून ते १९ जून या कालावधीत सरासरी ४३६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून मे महिन्यात १३ ते २७ मे या कालावधीत २९३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील सहा मंडलातील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे - १ जून ते १९ जून अखेर - पौड-३३३ , पिरंगुट-३०९, घोटावडे -४१८ , थेरगाव - ३७०, माले - ६४१, मुठा - ५४६.
04484
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.