उरुळी कांचन, ता. १९ : वळती (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता. १९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर रानटी जनावरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी मच्छिंद्र शिवराम कुंजीर, शंकर सुभान कुंजीर हे जखमी झाले आहेत.
मागील दोन वर्षात बिबट्याने १० ते १२ जनावरांवर हल्ला केला आहे. आता रानटी जनावरे शेतकऱ्यांवर हल्ला करत शेत पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी मच्छिंद्र कुंजीर आणि शंकर कुंजीर हे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुरे चारण्यासाठी येथील डोंगराच्या कडेला गेले होते. काही वेळानंतर गाय, म्हैस व बैल चरत आहेत का, हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना रानटी जनावर म्हशीवर हल्ला करत असल्याचे दिसले. त्याला हुसकविण्याचा प्रयत्न केला असता रानटी जनावराने शंकर कुंजीर यांना जोरदार धडक देऊन खाली पाडले, तर मच्छिंद्र कुंजीर यांच्यावर देखील हल्ला केला. जखमी झालेल्या शेतकऱ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत बोलताना पोलिस पाटील मोहन कुंजीर म्हणाले की, ‘‘या रानटी जनावरांचा खूपच त्रास वाढला असून शेतीतील पिके फस्त करत आहेत तसेच जनावरांवर सुद्धा हल्ले करत आहेत. आता ते शेतकऱ्यांवर सुद्धा हल्ला केला असल्यामुळे वळती गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर याची दखल घेऊन रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.