पुणे

कृषिपंपाच्या केबल चोरीने इंदापुरातील शेतकरी हैराण

CD

वालचंदनगर, ता. ३ : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीकाठचे शेतकरी विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे हैराण झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांसाठी नीरा नदी वरदान ठरली आहे. या भागातील रणगाव, निमसाखर, वालचंदनगर, कळंब परीसरातील अनेक शेतकऱ्यांची नीरा नदीवरती विद्युत पंप आहेत. शेतकऱ्यांनी पाइपलाइनद्वारे नीरा नदीचे पाणी निमसाखर, रणगाव, कळंब, वालचंदनगर परिसरामध्ये आणले आहे. शेतकऱ्यांचे नीरा नदीकाठी विद्युत पंप आहेत. त्यापासून ५० ते ६० मीटर अंतरावरती विद्युत पंप चालू करण्यासाठीचा पॅनेल बॉक्स बसवला आहे. पॅनेल बॉक्स ते विद्युत पंपापर्यंत विद्युत केबल टाकलेल्या आहेत. चोरट्यांनी विद्युत पंपाच्या केबल चोरण्याचा सपाटा लावला आहे. चोरीनंतर चोरटे केबलमधील तांब्याच्या तारा काढून विकत आहेत. या परीसरातील सुमारे २२ शेतकऱ्यांच्या केबलच्या चोरी झाल्या. त्यामध्ये संतोष गायकवाड, विजय गायकवाड, शरद गायकवाड, पोपट गायकवाड, सुनील गायकवाड, पांडुरंग गायकवाड, राहुल हुंबे, विलास गायकवाड यांच्या विद्युत पंपाचा समावेश आहे.
यासंदर्भात वालचंदनगर सरपंच व शेतकरी संतोष गायकवाड यांनी सांगितले की, एका शेतकऱ्याची एकावेळी सुमारे ६० मीटर केबलची चोरी होत आहे. आतापर्यंत किमान दोन वेळा केबलची चोरी झाली असून, शेतकऱ्यांना ५ ते १० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, पिकांना पाणी देण्यास विलंब होत आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर सलग पाचव्या दिवशी वाहतूक कोंडी; ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

SCROLL FOR NEXT