पुणे

‘छत्रपती’च्या कामगारांना १० टक्के वेतनवाढ

CD

वालचंदनगर ता. १३ : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना १० टक्के वेतनवाढ देण्यास कारखान्याच्या संचालक मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली. त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांनावेतन वाढ देणारा छत्रपती कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्रिपक्षीय समिती नियुक्त केली होती. समितीच्या २३ जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये १ एप्रिल २०२४ पासून साखर कारखान्यातील सर्व अधिकारी व कामगार यांचे मुळ पगार, महागाई व स्थिर भत्ता मिळून मिळणाऱ्या एकूण पगारावर १० टक्के पगारवाढ व सोयी-सुविधा देण्याचे मान्य करून करार करण्यात आला होता. सदर कराराची राज्यातील साखर कारखान्यांनी अंमलबजावणी केल्यानंतरच कामगारांना वेतनवाढ मिळणार आहे. भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील शुगर वर्कर्स युनियनने छत्रपतीच्या संचालक मंडळास त्रिपक्षीय समितीच्या कराराची अंमलबजावणी करावी, फॉर्म एलमध्ये बदल मागण्यांचे परिशिष्ट देवून वेतनवाढ व इतर सोयी सुविधांबाबत, तसेच २४ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या करारात बदल व्हावा, अशी विनंती केली होती. याबाबत संचालक मंडळाने बैठकीमध्ये त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना १० टक्के वेतनवाढ देण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
यावेळी बैठकीला कारखान्याचे संचालक, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, श्री.पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर, हनुमंत करवर, तांत्रिक सल्लागार महादेव निकम, कामगार नेते युवराज रणवरे, सतीश गावडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक उपस्थित होते.
सभासद व कामगार ही कारखान्याच्या एकाच रथाची दोन चाके आहेत. सभासदांच्या हिताचा विचार करीत असताना कामगारांच्या हिताला देखील सर्वोच्च प्रधान्य देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी संचालक मंडळ कुठेही मागे राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पृथ्वीराज जाचक व कैलास गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

Jitendra Awhad: आझादीमध्ये राहू द्या; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

Santosh Bangar Vs Gajanan Ghuge: वाकयुद्ध रंगलं, महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता | Politics | Sakal News

WAR 2 REVIEW: बेस्ट की पैसे वेस्ट? कसा आहे ह्रितिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' ; वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT