पुणे

आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग वाढला नजीकच्या भविष्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

CD

पुणे, ता. ९ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागातील पुरेशा खाटा याकडे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. याबरोबरच डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला होता. रुग्णांना उपचारांसाठी बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन बेड नव्हते त्यामुळे व्हेंटिलेटर बेड मिळणे अशक्यप्राय होते. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या बेसुमार वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. ही तिसरी लाटच असल्याचे म्हटले जाते. मात्र, सद्यःस्थितीत ऑक्सिजन, बेड, औषधे, व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पण, तिसऱ्या लाटेत याची गरज फारशी लागणार नाही, अशी स्थिती सध्यातरी आहे. या लाटेत आवश्यकता आहे ती तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांची. कारण, संसर्गाचा वेग जास्त असल्याने आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने ‘पॉझिटिव्ह’ होत आहेत. रुग्णालयाच्या एका विभागातील एका व्यक्तीलाही कोरोना झाल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला संसर्ग होत आहे. त्यामुळे एकेका विभागातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना एकाचवेळी सात दिवसांच्या विलगीकरणात जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचा नजीकच्या भविष्यात मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता शहरातील वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत.

आव्हाने कोणती आहेत?
कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळतील. त्यांची संख्या व्यवस्थित प्रमाणात वाढविण्यात यश आले आहे. पण, त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध करणे, हे मोठे आव्हान आहे. कारण, या लाटेत मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होत आहे. त्यातून रुग्णालयांतील मनुष्यबळात तुटवडा जाणवू लागला आहे.

काय करायला हवे?
- शहरातील उपलब्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांची माहिती घ्यावी
- पॉझिटिव्ह झाल्याने विलगीकरणात जाणाऱ्यांची नोंद ठेवावी
- उपलब्ध डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण यांच्या प्रमाणावर देखरेख करावी
- रुग्णसंख्या वाढल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत नियोजन करावे

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. यातील रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. पॅरासिटेमॉल, भरपूर क्षारयुक्त पाणी आणि विश्रांती या त्रिसूत्रीवर उपचार होत आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होतील. पण, सर्वांत महत्त्वाचे आव्हान, आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता हे आहे. क्रियाशील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी राहील याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
डॉ. कपिल झिरपे, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, रूबी हॉल क्लिनिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT