पुणे

...आता ‘जन की बात’ ऐकण्याचीही तयारी ठेवा

CD

पुणे, ता. ३ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना कायम ‘मन की बात’ सांगतात, पण त्यांनी आता ‘जन की बात’ ऐकण्याची तयारी ठेवावी. पंतप्रधान घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करतात, त्यापुढे जाऊन आता पंतप्रधानांनी ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी संविधान’ हे सांगण्याची गरज आहे,’’ अशा कडक शब्दात कष्टकरी व कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी (ता. ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने टिळक स्मारक येथे ‘महाराष्ट्र सन्मान परिषदे’च्या पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी आढाव बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शाहीर संभाजी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
निकालाचा आढावा घेताना डॉ.आढाव म्हणाले, ‘‘लोक भूमिका घेतात, राजकारण्यांपेक्षाही जनता दोन पावले पुढे असते, हे शिक्षक व पदवीधर निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. ते भ्रमामध्ये आहेत, जनतेला बदलायचे आहे हे दिसू लागले. एकीकडे अदानींचे जगात मार्केट वाढतेय, तर दुसरीकडे देशाचा क्रमांक घसरत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांशी आमची बांधिलकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार दिली, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी पाटी-पेन्सील दिली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला. ही वाटचाल रोखण्याचे काम सध्या सुरु आहे, आता भ्रमात राहू नका, ‘महाराष्ट्र सन्मान परिषदे’च्या माध्यमातून एकजुटीने लढा द्या.’’
अंधारे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना डॅमेज करण्याचे काम नियोजितपणे केले जात आहे. महापुरुषांच्या प्रतिमांना मोडीत काढून ते हेडगेवार, गोळवलकर यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहन भागवत संप्रदायाचे हे मनसुबे उधळवून लावण्याचे काम महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे. याच पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शिवाजी महाराजांविषयी भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त बोलूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध ठराव मांडण्याचा किंवा त्यांच्याबाबत केंद्राला पत्र पाठविण्याचे धाडस दाखविले नाही.’’
यावेळी जितेंद्र आव्हाड, महेश शिंदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT