बर्लिन व्यापार मेळाव्यात
राज्यातील पर्यटनाचा प्रचार
मुंबई, ता. ९ ः महाराष्ट्र पर्यटन विभाग जागतिक बाजारपेठेत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयटीबी बर्लिन व्यापार मेळाव्यात सहभागी झाला होता. हा मेळावा ७ ते ९ तारखादरम्यान झाला. देशातील तिसरे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे असून, ती जगभरातील पर्यटनाचे आकर्षण ठरू शकतात. राज्याची राजधानी मुंबई ही खऱ्या अर्थाने देशाचे प्रवेशद्वार आहे व राज्याला निळेशार समुद्र किनारे आहेत. निरभ्र आकाशाची देणगी मिळालेली आहे. त्यामुळे समृद्ध वारसा, संस्कृती, निर्सग, समुद्र किनारे व जंगले पाहण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्वकाही उपलब्ध होते. आयटीबी बर्लिनमध्ये १६१ देशातील ४०० वक्ते व २०० पॅनेल्सनी प्रतिनिधित्व केले. येथे महाराष्ट्राचे विशेष दालन होते व तेथे अजंठा व वेरुळच्या शिल्पकलेचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. मेळाव्यामुळे राज्यातील शिष्टमंडळाला जर्मन पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटण्याची, चर्चा करण्याची व व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्न करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन भारतीय पर्यटन विभागाचे सचिव अरविंद सिंग यांनी केले. या वेळी भारतीय दूतावासातील राजदूत पी. हरीश उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.