पुणे

जलजीवन मिशन अंतर्गत २८३ पाणी पुरवठा योजना पूर्ण

CD

पुणे, ता. १५ : पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजीपी) ‘जलजीवन मिशन योजनें’तर्गत २८३ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे अडीच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च या योजनेसाठी झाला आहे.

सर्वाधिक १६८ योजना पुणे जिल्ह्यात राबविल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात १५ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे.
पुणे विभागातील ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ या अभियानांतर्गत नव्या आणि जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन करणे अशा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, क्षमतावाढ किंवा दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबविण्यास कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत.

तसेच या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनी दिली.


पुणे विभागात गेल्या आर्थिक वर्षात झालेली कामे
जिल्हा झालेली कामे झालेला खर्च
पुणे १६८ ४० कोटी ८० लाख
सातारा ४९ ६७६ कोटी ९९ लाख
सांगली २८ ५०० कोटी
सोलापूर २३ ७६० कोटी १५ लाख
कोल्हापूर १५ ६१६ कोटी २० लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT