पुणे

सैन्यावर विश्वास ठेवणे आवश्यक माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची नागरिकांकडून अपेक्षा

CD

पुणे, ता. १७ ः ‘‘आजच्या काळात समाजमाध्यमांवरून अफवा वेगाने पसरतात. अशावेळी नागरिकांनी सैन्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठिंबा देणे, ही सर्वाधिक गरजेची गोष्ट आहे. तीच लष्करासाठी मोठी मदत ठरेल.’’ असे मत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी रविवारी व्यक्त केले.
ज्ञान प्रबोधिनीतर्फे अप्पा पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘रूप पालटू’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर त्यांच्याशी सारंग दास्ताने यांनी संवाद साधला. याप्रसंगी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट उपस्थित होते. ‘‘लष्कर अधिक समाजाभिमुख होत असून, त्यातून लोकांचा लष्करावरील विश्वास वाढण्यास मदत होईल.’’ असेही नरवणे म्हणाले.
स्वदेशी संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीबाबत नरवणे म्हणाले, ‘‘कोणत्याही देशाचे संपूर्ण शस्त्र उत्पादन देशांतर्गत होणे शक्यच नाही; काही गोष्टी आयात कराव्याच लागतात. मात्र, शस्त्रातील सर्वात महत्त्वाच्या भागाचे उत्पादन आपल्या देशातच व्हावे, यावर भर द्यायला हवा. त्यामुळे येत्या काळात याबाबतच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.’’
‘‘एक स्थिर आणि विश्वासार्ह देश म्हणून जग भारताकडे पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लुक ईस्ट’ या धोरणांतर्गत आजवर काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या पूर्वेकडील देशांशी संबंध उत्तम करण्यावर भर दिला आहे. कारण येत्या काळात केवळ विशिष्ट देशांमध्ये नाही, तर जगभरात आपल्याला प्रभाव वाढवायचा आहे. आपले धोरण दीर्घकालीन आणि विश्वासार्ह असल्याने आपण अर्ध्यातच कोणत्याही देशाची साथ सोडणार नाही, याची जगाला खात्री आहे. सध्या एका देशात तसे होते आहे.’’ असा टोला नरवणे यांनी अमेरिकेचे नाव न घेता लगावला.
----
देशांतर्गत अस्थिरतेवर विकास हेच उत्तर
‘‘देशातील काही भागांमध्ये आर्थिक सुबत्ता कमी असल्याने तेथील लोक बेकायदेशीर गोष्टींमध्ये अडकतात. त्यातून मग देशविरोधी कार्य करणाऱ्या शक्तींकडे ही लोक ओढली जातात. मात्र, ‘रोटी, कपडा आणि मकान’ मिळाले, तर कोणीही शस्त्र हाती घेणार नाही. त्यामुळे या देशांतर्गत अस्थिरतेवर विकास हेच उत्तर आहे,’’ असे प्रतिपादन मनोज नरवणे यांनी केले.
----
‘अग्निवीरमुळे देशाचाही फायदा’
‘‘सैन्याचे प्रशिक्षण घेऊन समाजात वावरणारे लोक समाजाला अधिक सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी मदत करतात. इस्राईलमधील उदाहरणाने हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘अग्निवीर’मधून बाहेर पडलेली लोक समाजात विविध पदांवर काम करतील, तेव्हा समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलतील’’, असा विश्वास मनोज नरवणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...

Stock Market Closing: सेन्सेक्स 676 अंकांच्या वाढीसह बंद; ऑटो, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रात जोरदार खरेदी

Nashik Air Pollution : नाशिकमध्ये वाहनांचा धूर जीवघेणा; प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT