पुणे, ता. ६ : जुन्नर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली असून, महिला व लहान मुलांचे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत याबाबत वन विभाग, जिल्हाधिकारी आणि मानवाधिकार आयोगाला कायदेशीर नोटीस पाठवून तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. पुनम जगताप यांनी ही नोटीस पाठवली आहे. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे मूलभूत जीवनाधिकार (कलम २१) बाधित होत आहेत. शेतकरी भीतीत जगत आहेत, मुलांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. प्रशासनाची निष्क्रियता नागरिकांच्या सुरक्षेला तडा देणारी आहे. त्यामुळे आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असे नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
प्रशासनाने घ्यावयाच्या काही तातडीच्या उपाययोजना नोटिशीमध्ये नमूद केल्या आहेत. धोकादायक भागात सीसीटीव्ही, सोलार लाइट, पिंजरे आणि रात्री गस्त पथके तैनात करणे, जखमी व मृतांच्या कुटुंबांना त्वरित नुकसानभरपाई देणे, वारंवार हल्ले करणाऱ्या बिबट्यांचे सुरक्षित पुनर्वसन किंवा स्थलांतर, तसेच गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे यांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक गावाचे सर्वेक्षण करून उसापासून ते जनावरांच्या चारणक्षेत्रांपर्यंत सर्व माहितीचा सविस्तर अभ्यास करण्याची मागणीही केली आहे.
जुन्नर परिसरात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता याबाबत दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.
- अॅड. पुनम जगताप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.