पुणे

संकलित मूल्यमापन चाचण्या एकाचवेळी

CD

पुणे, ता. ५ : राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी दोन आणि नियतकालिक मूल्यांकन एकाच वेळी होईल. ८ ते २५ एप्रिल हा कालावधी त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, हे यामागील उद्देश आहेत. सर्व माध्यमे आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना ते लागू असेल. या इयत्तांच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये होतात. एप्रिलच्या सुरवातीस वार्षिक परीक्षा झाल्यानंतर शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. त्यामुळे सर्व शाळांमध्ये एकवाक्यता यावी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (पॅट) होणार आहेत. त्याला अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-एक, संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन चाचण्या घेण्यात येतात.
‘संकलित मूल्यमापन चाचणी दोन’साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरून करण्यात येईल. त्यासाठी ‘एससीईआरटी’ने वेळापत्रक दिले आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांना ‘पॅट’अंतर्गत इयत्ता तिसरी ते नववीच्या प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) विषयांसाठी संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका ‘एससीईआरटी’च्या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील.
इतर व्यवस्थापनांच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्याच्या आहेत. पहिली आणि दुसरीसाठी सर्व विषयांच्या आणि तिसरी ते नववीच्या अन्य विषयांच्या संकलित चाचणी-दोन लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे, नववीच्या ‘पॅट’शिवाय अन्य विषयांसाठी शाळा स्तरावरून वेळापत्रक ठरवावे, अशी सूचना ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे.
.............
हे काम पाच दिवसांत कसे शक्य?
राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, ‘संकलित चाचणी दोन आणि नियतकालिक मूल्यांकन चाचणी यानुसार शेवटचा पेपर २५ एप्रिलला आहे. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एका शिक्षकाला किमान ४०० ते ५०० उत्तरपत्रिकांचे अवलोकन करावे लागते. याशिवाय निकाल तयार करून त्याची पडताळणी करावी लागते. हे काम अवघ्या पाच दिवसांत कसे शक्य आहे? याशिवाय ‘पॅट’अंतर्गत उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून त्यांचे गुणही नोंदवायचे आहेत. त्यामुळे यावर गांभीर्याने फेरविचार व्हावा. ‘पॅट’वगळता इतर विषयांची परीक्षा घेण्याचे नियोजन शाळा स्तरावर पूर्वीप्रमाणेच असावे.’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी 'हे' उपाय करा, मात लक्ष्मी-नारायणाची तुमच्यावर कायम राहील कृपादृष्टी

SCROLL FOR NEXT