पुणे, ता. ३ : ‘‘श्रीपाद भालचंद्र जोशी यांची समीक्षा ही त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या जाणिवांचाच समीक्षात्मक विस्तार असतो; तर त्यांची कविता ही जीवनाची सर्वांगीण समीक्षाच करत असते’’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांच्या ‘सर्ग’ व ‘त्यानंतर’ हे दोन कवितासंग्रह आणि ‘समीक्षेची संस्कृती आणि संस्कृतीची समीक्षा’ या समीक्षा ग्रंथाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. विश्व मराठी परिषद, विदर्भ सांस्कृतिक परिषद, पद्मगंधा प्रकाशन आणि दिलीपराज प्रकाशनातर्फे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे, कवयित्री अंजली कुलकर्णी, विश्व मराठी परिषदेचे संस्थापक-संचालक अनिल कुलकर्णी, लेखक श्रीपाद जोशी आदी उपस्थित होते.
‘समीक्षेची संस्कृती आणि संस्कृतीची समीक्षा’ हा ग्रंथ संस्कृतीकडे बघण्याची व्यापक व समग्र दृष्टी प्रदान करतो’, असेही सबनीस म्हणाले. ‘‘लेखक, कवी, विचारवंत हा एकूण व्यवस्थेचाच भाष्यकार असतो. तो कोणत्याही विशिष्ट विचारसरणीला बांधलेला असेल तर प्रचारक होतो; पण त्याची बांधिलकी ही समग्र जीवन वास्तवाशी असेल तर तो भयमुक्त अभिव्यक्तीसाठी सर्जनशील संघर्ष करणारा ठरतो’’, असे श्रीपाद जोशी म्हणाले. प्रा. अनिकेत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.