पुणे

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘बत्ती गुल’

CD

पुणे, ता. २७ ः प्रयोग ऐन रंगात आलेला...कलाकार आणि रसिक नाटकाशी समरस झालेले अन् तितक्यात नाट्यगृहातील ‘बत्ती गुल’ होते...हे केवळ एकदा नाही, दोनदा नाही तर एकाच प्रयोगात तब्बल पाच ते सहा वेळा घडले. कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाच्या प्रयोगादरम्यान असा प्रकार वारंवार घडल्याने कलाकार आणि रसिकांचा रसभंग झाला.
उंदीर-घुशींचा वावर, डासांचा उच्छाद, वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड अशा अनेक नकोशा कारणांसाठीच चर्चेत असलेल्या या नाट्यगृहात आता या नव्या समस्येची भर पडली आहे. या आठवड्यातील एका रात्रीच्या प्रयोगादरम्यान हा ‘बत्ती गुल’ होण्याचा प्रकार घडला. नाटक सुरू होण्यापूर्वीच दोनदा वीज जाण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर नाटक सुरळीत सुरू झाले. मात्र, नाटकाच्या उत्तरार्धात तीन ते चार वेळा पुन्हा हाच प्रकार घडला. नाट्यगृहातच जनरेटरची व्यवस्था असते. मात्र, ते सुरू होण्यासाठीदेखील काही सेकंदांचा अवधी जावा लागतो. त्यामुळे वीज गेल्यावर जनरेटर सुरू होऊन प्रयोग पूर्ववत होण्यासाठी प्रत्येक वेळी मिनिटभराचा अवधी जात होता. त्यात लक्ष विचलित झाल्याने कलाकारही प्रयोग जिथे थांबला, त्या क्षणाच्या काही क्षण पूर्वीपासून प्रयोग सुरू करत होते. हे वारंवार घडल्याने कलाकारांनाही त्याच ऊर्जेने पुन्हा प्रयोग सुरू करण्यास अडचणी येत होत्या.
गेल्या दोन आठवड्यातील अन्य काही प्रयोगांनाही असाच प्रकार घडल्याचा अनुभव अन्य काही प्रेक्षकांनी सांगितला. नाटक गंभीर असो किंवा विनोदी, त्यात अडथळा आल्यास प्रेक्षकांचा साहजिकच रसभंग होतो. कलाकारांचाही उत्साह काहीसा मावळतो. त्यामुळे यामागचे कारण शोधून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपस्थित प्रेक्षकांनी केली.

चूक नक्की कोणाची?
हा प्रकार नाट्यगृहातील यंत्रणेच्या बिघाडामुळे होत आहे की महावितरणच्या यंत्रणेतील दोष आहे, हे स्पष्ट झालेले नाही. याबाबत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे अधीक्षक दीपक एकबोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत पुरेशी माहिती नसल्याने भाष्य करण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT