पुणे : घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील धरणे भरत आली आहेत. त्यामुळे राज्यातील २ हजार ९९७ धरणांमध्ये ९१६.७५ टीएमसी म्हणजे ६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
तर ३४ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्याला दिलासा देणाऱ्या जायकवाडी धरणांतील चल पाणीसाठा १५.३१ टक्केपर्यंत पोहोचला आहे. पुण्यात झालेल्या दमदार पावसामुळे अखेर उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणाचे १६ दरवाजे उघडले असून भीमा नदीतील विसर्ग १ लाख १६ हजार क्युसेकपर्यंत वाढवला आहे.
भीमा खोऱ्यातील जवळपास २२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्याकडून उजनीत येणारे पाणी पुढे भीमा नदीत सोडण्यात येत आहे. वीर धरणाकडून नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनी शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडला आहे. पंढरपूरसह नदीकाठच्या शंभर गावांत पूरस्थितीची झळ बसत असून चंद्रभागेला पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक धरणांतून विसर्ग सुरू...
राज्यातील २,९९७ धरणांमध्ये ९१६.७५ टीएमसी साठा.
पुणे विभागातील ७२० लहान मोठ्या धरणांमध्ये ४३१.८२ टीएमसी साठा.
उजनीतील विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती निर्माण.
कोयना धरणामध्ये सद्यःस्थितीत ८१.८१ पाणीसाठा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.