मोबाईल उत्पादनात भरारी; मागील दहा वर्षांत २१ पटींनी वाढ Sakal
Personal Finance

Mobile Phone : मोबाईल उत्पादनात भरारी; मागील दहा वर्षांत २१ पटींनी वाढ

उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्यासारख्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील दहा वर्षांत भारतात मोबाईल फोनच्या उत्पादनात २१ पटींनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्यासारख्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील दहा वर्षांत भारतात मोबाईल फोनच्या उत्पादनात २१ पटींनी वाढ झाली आहे. एकूण मूल्याचा विचार करता हे उत्पादन ४.१ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे ‘इंडियन सेल्युलर अँड इकॉनॉमिक असोसिएशन’ने एका निवेदनाद्वारे सांगितले.

या उत्पादनवाढीमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्याही भारतात गुंतवणूक करत असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील उत्पादनाला बळ मिळत आहे, असे ‘आयसीईए’ने सांगितले आहे. ‘आयसीईए’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मोबाईल फोनच्या मागणीपैकी ९७ टक्के गरज देशांतर्गत उत्पादनातूनच भागविली जात आहे.

तसेच, २०२४ या वर्षात तर होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादनाची निर्यात होणार आहे. निर्यात वाढण्यामागे ॲपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी मोलाची भर टाकली आहे. या कंपन्यांनी भारतात बनविलेले फोन ब्रिटन,

नेदरलँड, ऑस्ट्रिया, इटली, आखाती देश, दक्षिण अमेरिका खंड आणि उत्तर आफ्रिकेत निर्यात केले जातात. मागील दहा वर्षांत भारतात २४५ कोटींहून अधिक मोबाईल फोन संचांचे उत्पादन झाले आहे.

मोबाईल फोनचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने २०१७ वर्षीच्या मे महिन्यात ‘फेझ्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रॅम’ जाहीर केला होता. यामुळे या उद्योगाला पूरक वातावरण आणि यंत्रणा निर्माण होण्यास मदत झाली.

त्यामुळे दहा वर्षांपूर्वी मोबाईल फोन उत्पादनाच्या केवळ दोन कारखाने असणारा भारत आज या क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, असे ‘आयसीईए’ने म्हटले आहे. भारताच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन फायदे देण्याच्या धोरणामुळे फॉक्सकॉन,

पेगाट्रॉन, रायझिंग स्टार आणि विस्ट्रॉनसारख्या विदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन करण्यास सुरुवात केली. सॅमसंगसारख्या कंपनीनेही नोएडामध्ये त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा कारखाना सुरू केला.

उत्पादनवाढ (कोटी रुपयांत)

२०१४-१५

१८,९०० - उत्पादन मूल्य

१,५५६ - एकूण निर्यात

२०२३-२४

४,१०,००० - उत्पादन मूल्य

१,२०,००० - एकूण निर्यात

वाढीचे प्रमाण (२०१४ च्या तुलनेत)

२०००% - उत्पादन मूल्यातील वाढ

७५००% - निर्यातीत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

Latest Maharashtra News Updates Live : "हे अत्यंत दुर्दैवी आहे, कितीही निषेध केला तरी पुरेसा नाही... पोलिसही यात सहभागी आहेत... हे कसले सरकार आहे? काँग्रेस नेते रशीद अल्वी

Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Hardik Pandya : २० षटकार, ११ चौकार... हार्दिक पांड्याला आली लहर अन् करतोय कहर; १९ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक अन्...

SCROLL FOR NEXT