Senior
Senior 
सप्तरंग

#MokaleVha : ज्येष्ठांचा पुनर्विवाह (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

उतारवयात लग्न करून काय फायदा होणार आहे. मुलं जर चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत, तर त्यांच्यामध्ये खुश राहावं. दुसरे लग्न करायचा विचार केला तर पहिल्या जोडीदारासारखा दुसरा जोडीदार असणार का? नाही तर आगीतून उठा आणि फुफाट्यात पडा अशी स्थिती होऊ शकते का?


उतारवयामध्ये लग्न ही संज्ञा सर्वांना लागू होणार असे मुळीच नाही. मुलं जर चांगल्या पद्धतीने सांभाळत असतील तर ज्येष्ठ नागरिक कधीही एकटे पडणार नाहीत, एकाकीपणा त्यांना जाणवणार नाही. अशा वातावरणामध्ये व्यक्तीला जोडीदाराची गरज पडणार नाही. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये जेथे मुलं आईला किंवा वडिलांना सांभाळत नसतील, तर मात्र अशा ज्येष्ठांच्या जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो. अशा परिस्थितीमध्ये उतारवयामध्ये जोडीदार असेल तर जगणं सुसह्य होईल. काही ठिकाणी मुलांना वृद्ध आई किंवा वडील नको असतात. म्हणूनच तर वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागली आहे. नशिबाने मुलांनी सांभाळलं तर त्यासारखं सुख नाही; परंतु प्रत्येकालाच हे सुख मिळेल असं होत नाही. अशा ठिकाणी या संज्ञेचा उपयोग होतो.

माझ्या आईचं निधन झालं आहे. आमच्या पप्पांना बरेचजण दुसरं लग्न करा असं म्हणत आहेत. माझं व माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे. सध्या पप्पांजवळ १२ वीत शिकत असलेला माझा भाऊ आहे. एक मुलगी म्हणून दुसरं लग्न म्हणजे आईची जागा दुसऱ्या व्यक्तीला देणं ही संकल्पना मला पटत नाही.
तुमचं म्हणणं बरोबर आहे. स्वतःच्या आईची जागा कोणतीच आई घेऊ शकत नाही; परंतु परिस्थितीप्रमाणे व्यक्तीला निर्णय घ्यावे लागतात. कधी गरज म्हणून, तर कधी आधार म्हणून. पुरुषाला बाहेरच्या जगात उत्पन्नाचं साधन म्हणून काम करून पैसे कमवावे लागतात. अशा वेळी घर सांभाळणारं, मुलांना बघणारं कोणी तरी घरी असावं लागतं. व्यवहाराच्या दृष्टीनेसुद्धा आणि भावनिक दृष्टीनेसुद्धा कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. 

मला दोन मुलं असून ते दोघेही कामानिमित्त बाहेरगावी असतात. तिकडे ते त्यांच्या कुटुंबासह राहतात; परंतु मला मी जिथे आता राहत आहे, तिथेच राहायचे आहे. मी पुनर्विवाहाचा विचार करतो; पण अनेकदा मुलं किंवा लोक काय म्हणतील याची मला भीती वाटते.
लग्न करण्यापूर्वी प्रथमतः जोडीदाराची निवड करताना संपूर्ण चौकशी करा. त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे बघणं गरजेचं आहे. गरजू जोडीदाराचीच निवड करा. संपत्ती, मिळकत यावर स्पष्टपणे बोला. मुलांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यासमोर तुमची पुनर्विवाहाची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे संपूर्णपणे कल्पना द्या. जोडीदाराचं मानसिक, शारीरिक आरोग्य बघणंदेखील गरजेचं आहे. या सर्व बाबींचा विचार करा. अत्यंत निरपेक्षपणे, निर्मळ मनाने जोडीदाराची निवड होणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, लोक काय म्हणतील! सर्वप्रथम स्वतःचा विचार करा. लोक दोन्ही बाजूने बोलतात, त्यावर जास्त विचार करू नका. लोक काय म्हणतील याहीपेक्षा मला उर्वरित दैनंदिन आयुष्य सुसह्य कसं करता येईल याचा विचार करा. स्वतःची गरज काय, याबाबत पारदर्शकपणे आत्मपरीक्षण करा आणि निर्णय घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT