uday samant
uday samant sakal
सातारा

कऱ्हाड : पंधरा फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइनच; उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्यात कोरोना स्थितीमुळे १५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. १५ फेब्रुवारीनंतर राज्यातील कोरोनाचा आढावा व कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यात उद्यापासून (ता. १) सर्व महाविद्यालये सुरू होतील. कोरोना प्रतिबंध लशीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातील महाविद्यालये उद्यापासून सुरू होत आहेत. कोरोना प्रतिबंध लशीचे दोन डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. ज्या विद्यार्थ्यांच्या लस घेतलेल्या नाहीत. त्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाईल. स्थानिक पातळीवरील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून महाविद्यालये सुरू करावीत. विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शिबिरे घ्यावीत, याबाबतचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशीही माहिती देऊन मंत्री सामंत म्हणाले, ‘‘राज्यात कोरोना स्थितीमुळे १५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील. १५ फेब्रुवारीनंतर राज्यातील कोरोनाचा आढावा व कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात लसीकरणाची स्थिती चांगली आहे. एक हजार ६८५ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे आठ दिवसांत १०० टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. खासगी महाविद्यालयांसाठी लसीकरणाची मोहीम राबवून विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे, याचीही सक्ती केली आहे.’’

राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या स्थानिक विकास निधी खर्चाच्या अधिकाराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत प्राचार्यांच्या अधिकारातील खर्चाची मर्यादा ५० हजारांवरून तीन लाख, सहसंचालकांच्या अधिकारातील दोन लाखांवरून पाच, तर संचालकांच्या अधिकारातील खर्चाची मर्यादा तीन लाखांवरून दहा लाखांपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, त्या खर्चाचे व कामाचे ऑडिट होणार आहे, अशी माहिती देऊन श्री. सामंत म्हणाले, ‘‘महाविद्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात येणार आहे. त्यात सफाई व शिपाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात येईल. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या पगारामध्ये चार हजारांची वाढ होणार आहे. त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. जानेवारी ते मार्चचा फरकही दिला जाईल.’’

न्यायालयाने भाजपच्या आमदारांना न्याय दिला, तसाच राज्यपाल नियुक्त आमदारानांही मिळेल, अशी माजी व्यक्तिगत भावना आहे. त्याचा पक्षाशी अथवा नेत्यांचाही काहीही संबंध नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून मी न्यायालयात जाण्याचा विचार करत आहे. उद्या त्याचा अंतिम निर्णय होईल.

- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT