सातारा

नवीन वाहतूक दंडातून रिक्षा वगळा; चालक-मालक संघटनेची आरटीओंकडे मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड - राज्य सरकारने परिवहन विभागाच्यावतीने नवीन वाहतुक दंडाची आकारणी सुरु कण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामधुन रिक्षांना वगळावे, अशी मागणी कऱ्हाड तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने आरटीओंना निवेदन देवुन करण्यात आले आहे.

रिक्षा संघटनेच्यावतीने आज वसंत देवाडिगा, मकसुद बागवान, सुनिल चक्के, आयुब नदाफ, संजय भिलवडे, मुसा शेख, रमजान कागदी, मुराद आगा, भागाप्पा जमादार, मामा पवार यांच्यासह रिक्षा चालक-मालक उपस्थित होते. निवेदनातील माहिती अशी ः कोरोनामुळे रिक्षा चालक-मालकांवर मोठी वाईट अवस्था आली आहे. दोन वर्षे व्यवसाय नसल्याने अनेक रिक्षा चालक-मालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यातच सध्या नवीन वाहतुक दंडाची आकारणी राज्य सरकारकडुन करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्यामध्ये दंडाची रक्कम २५ ते ३५ हजार रुपये असणार आहे.

रिक्षा चालक-मालकांची दररोजची कमाई ३०० ते ४०० रुपये आहे. त्याचबरोबर या व्यवसायात अनेक तरुण आहेत. त्यामध्ये तीन प्रवाशांनाच परवानगी असते. त्यामुळे नवीन दंड रिक्षा व्यावसायीकांना न परवडणारा आहे. त्यामुळे सरकाराने रिक्षा व्यावसायीकांच्या कमाईचा विचार करुन या सुलतानी दंडातुन रिक्षांना वगळावे, अशी मागणी आम्ही करत आहोत. त्याचा सकारात्मक विचार व्हावा. अन्यथा अॅटोरिक्षा संयुक्त महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावा, असाही इशारा निवेदनातुन देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT