Balasaheb Patil
Balasaheb Patil sakal
सातारा

शाहू महाराजांच्या विचारावर सरकारची वाटचाल : बाळासाहेब पाटील

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजकारण, प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाने पुरोगामी महाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला. त्यांच्या विचारावर महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटी यांनी केले.

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सकाळी येथील शाहु चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्राला दिशा, पुरोगामी विचार देण्याचे काम छत्रपती शाहु महाराज यांनी केली. त्यांच्या विचाराने राज्याचा कारभार सुरु आहे.

शाहु महाराजांचे यंदाचे हे शताब्दीवर्ष वैशीष्टपुर्ण साजरे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्यानुसार १०० व्या पुण्यतिथीदीनी आज १०० सेकंद सकाळी दहा वाजता शाहु महाराजांसाठी अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेतला आहे. त्यानिसार आज कऱ्हाडमध्ये शाहु महाराजांच्या पुतळ्यासमोर केला आहे. शाहु महाराजांच्या विचाराने हा पुरोगामी महाराष्ट्र निश्चीतपणे पुढे जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT