सातारा

वीर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; पाण्याचा विसर्ग सुरू

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. वीर धरणातून 14 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत आहे, अशी माहिती धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. 

दरम्यान, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा नदीतही पाणी वाढू लागले आहे. पावसामुळे दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढत आहे. त्यामुळे वीर धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणातून विद्युतगृहातून 600 क्‍युसेक व दरवाजातून 13911 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उचलण्यात आले असून, त्यातून 13911 क्‍युसेक व विद्युतगृहातून 600 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT