Prithviraj Chavan  Sakal
सातारा

Prithviraj Chavan : प्रत्येक पद आपल्याच घरात पाहिजे असा आग्रह धरणाऱ्यांना चपराक

कऱ्हाड बाजार समितीत कऱ्हाड तालुक्याच्या मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजुने कौल दिलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या विरोधात झालेले मतदान हे अत्यंत महत्वाचे आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड बाजार समितीत कऱ्हाड तालुक्याच्या मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजुने कौल दिलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या विरोधात झालेले मतदान हे अत्यंत महत्वाचे आहे.

कऱ्हाड - कऱ्हाड बाजार समितीत कऱ्हाड तालुक्याच्या मतदारांनी कॉंग्रेसच्या बाजुने कौल दिलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या विरोधात झालेले मतदान हे अत्यंत महत्वाचे आहे. वारे कोणत्या बाजुने वाहत आहे हे बाजार समितीच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. पैशाच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक पद आपल्याच घरात आले पाहिजे असा दुरागृह विरोधकांनी केला त्याला मतदारांनी चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड बाजार समितीतील विजयानंतर आज दिली.

कऱ्हाड (जि.सातारा) बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते विलासराव पटील-काका रयत पॅनेलने १८ पैकी १२ जागा जिंकुन बाजार समितीची सत्ता कायम राखली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला सहा जागाच मिळाला.

बाजार समितीतील विजयानंतर आमदार चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, बाजार समितीची निवडणुक ही सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. त्यांनीच ही निवडणुक लढवली. काही पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केली. बाजार समितीची निवडणुक ही पक्षीय चिन्हावर नसली तरीही लोक कोण त्या निवडणुकीत भाग घेत होते ते माहिती आहे. त्यानुसार कॉंग्रेस विरुध्द भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत झाली. त्यामध्ये कॉंग्रेसच्या विचाराचे लोक निवडुन आले ही आनंदाची बाब आहे.

कऱ्हाड तालुक्यातील लोकांनी विकास कामांना, चांगल्या विचाराच्या लोकांना मते दिली आहे. पैशाच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक पद आपल्याच घरात आले पाहिजे असा दुरागृह विरोधकांनी केला त्याला मतदारांनी चपराक दिली आहे. अत्यंत सामान्य कार्यकर्त्यांनी बाजार समितीची ही निवडणुक जिंकलेली आहे.

विरोधकांनी मतदारांना स्वातंत्र्यच ठेवले नाही - अॅड. उंडाळकर

कऱ्हाड बाजार समिती निवडणुकीत सरंमजामशाही लोकांनी लोकांना कोंडीत धऱण्याचा प्रयत्न केला. विलासकाकांच्या विचारानुसार समविचारी लोकांना बरोबर घेवुन प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही निवडणुक लढवली, अशी प्रतिक्रीया विजयानंतर देवुन अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, विरोधकांनी सर्वसामान्य लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, काही मतदारांना उचलुन नेवुन मतदानासाठी आणले, त्यांना विचारांचे स्वातंत्र्य ठेवले नाही.

सर्वसामान्य जनतेने यापुढील निवडणुकीत प्रस्थापित लोकांना थारा देवु नये. रयत संघटनने ही निवडणुक संघर्षातुन कष्टातुन लढवली. त्याचाच हा विजय आहे. विलासकाकांच्या विचाराने जे काम सुरु आहे, संस्था सुरु आहेत त्या पुढेही कायम सुरु राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update : भाजपकडून २६ बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

SCROLL FOR NEXT