सातारा

दिवाळी निमित्त ठाणे, सोलापूरसह राज्यभरात साता-याहून एसटीच्या जादा गाड्या

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक ठप्प होती. मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या एसटी स्थानकांवर दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या सातारा विभागाच्या वतीने जादा 90 फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली एसटी सेवा गेल्या महिन्यात सुरू झाली. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. मात्र, आता प्रवाशांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एसटी विभागाने दिवाळीनिमित्त उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्‍वर, मेढा, खंडाळा, वडूज या 11 स्थानकांमधून नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 90 फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर, लातूर, महाड व राज्यभरातील इतर ठिकाणी जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.

मुंबईबाहेरील ST कर्मचाऱ्यांना आता जेवणाऐवजी भोजन भत्ता; दैनंदिन 200 रुपये देण्याचा एसटीचा निर्णय
 
प्रवाशांची संख्या वाढल्याने गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जाणाऱ्या एसटी फेऱ्याची संख्या पूर्वीप्रमाणे केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

व्यावसायिकांची घरपट्टी माफ करा, उदयनराजे गरजले  

दिवाळीनिमित्त सातारा आगारातून नियमित फेऱ्याव्यतिरिक्त इतर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
 
रेश्‍मा गाडेकर; एसटी आगारप्रमुख (कनिष्ठ), सातारा. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT