Satara Latest Marathi News 
सातारा

पाटण तालुक्‍यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्‍या प्राण्यांचे जीवन धोक्यात

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : डोंगरांना मोठ्या प्रमाणात लावले जाणारे वणवे, त्यात भस्म होणारी वनसंपदा, जंगलातील पाणवठ्यांची घटणारी संख्या यामुळे रानगवे नागरी वस्तीकडे "कुच' करत आहेत. पाटण तालुक्‍यातील धावडे गावाजवळ पाण्याच्या शोधार्थ आलेला पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला. त्यातील चार गव्यांना वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासात होणारे नागरिकांचे अतिक्रमण आणि त्यांना होणारा त्रास थांबवण्याचीच गरज यातून अधोरेखित होत आहे. 

पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तेथेही घनदाट जंगल आहे. उन्हाळ्यात डोंगरांना मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात. त्यामुळे हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होतात. वनविभागाला सुद्धा त्याची भनक नसते. वनक्षेत्र असलेले पाणवठे पाण्याअभावी ओस पडल्याने गवे नैसर्गिक अधिवासातून बाहेर येत आहेत. पाण्याच्या शोधात असलेले पाच गवे विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना धावडे गावात नुकतीच घडली. त्यात एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

गवे, बिबट्या मानवी वस्तीत येणे नवीन राहिलेले नाही. गवा जंगलात होता. नंतर तो शेतात आणि सध्या गावात आला आहे. खरं तर गवा हा जंगली प्राणी महाकाय आणि वजनदार आहे. हा रवंथ करणारा प्राणी असून, गवत, झाड पाला हे त्याचं खाद्य आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या वणव्यात वनसंपदा जळून त्यांचे खाद्य नष्ट झाले. त्यामुळेच ते नागरी वस्तीत येत आहेत. त्यासाठी आता नागरिकांचेच प्रबोधन करण्याची गरज आहे. 

वन विभागाच्या पुढाकाराची गरज
 
जंगलातील पाणवठे पाण्याअभावी ओस पडले आहेत. डोंगरांना सातत्याने वणवे लावले जात आहेत. त्याचा विचार करून आता वन विभागानेच पुढे येऊन डोंगरांना लावले जाणारे वणवे रोखण्याची आणि वन्य प्राण्यांच्या पाण्याची सोय करण्याची गरज आहे. प्राण्यांना त्यांच्या परिसरात आवश्‍यक त्या सुविधा देण्यात आल्यास त्यांचे नागरी वस्तीतील वावर बंद होऊन त्यांची सुरक्षित राहतील. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT