Satara 
सातारा

शाश्वत उत्पन्नासाठी आता ग्राम कृषी विकास समिती, शासनाचा निर्णय

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर निगडित आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, किड व रोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, अचानक शेतीमालाच्या दरात घसरण होणे या कारणामुळे शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. त्यासाठी स्थानिक स्तरावर विचारविनिमय होऊन मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात लोकप्रतिनिधी, कर्मचारी व कृषी तज्ज्ञ अशा 12 जणांचा समावेश असणार आहे. 

शेतकरी सातत्याने शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो. मात्र, अलीकडे हवामानात बदल होत आहे. त्याचबरोबर पाऊसही सध्या वेळेत पडत नाही. वातावरणातील बदलामुळे अनेक किडरोगांचा प्रादुर्भाव पिकावर होऊ लागला आहे. त्यामुळेही उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांना दर हंगामात पेरण्यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे मिळेलच याचीही खात्री राहिलेली नाही. नुकत्याच त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर एकाच प्रकारच्या शेतमालाचे शेतकऱ्यांनी उत्पादन घेतल्यामुळे बाजारपेठेत शेतमालाची जादाची आवक होऊन शेतीमालाच्या दरात घसरण होते.

त्यामुळे आता शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्रीच राहिलेली नाही. त्यावर गावातच मार्गदर्शन मिळून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पानाची खात्री मिळावी, यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील गावोगावी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत, तर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी हे सदस्य असतील, तर कृषी सहायक हे सहसचिव, तर ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. 

पाच वर्षांचा कालावधी 

ग्रापंचायतीच्या कालखंडाएवढीच म्हणजेच पाच वर्षांचीच समितीची मुदत असणार आहे. एखाद्या ग्रामपंचायतीत नवीन सदस्य निवडून आल्यावर त्या ग्रामपंचायतीत 45 दिवसांत ही समिती गठीत करण्यात आली पाहिजे. पदसिद्ध सदस्यांशिवाय इतर सदस्यांची निवड ही ग्रामसभेतून करावी लागणार आहे. समितीच्या अध्यक्षांचा कालावधी हा त्यांच्या कारकिर्दीएवढाच असणार आहे. 

समितीला आहेत ही बंधने 

समितीची प्रत्येक महिन्याला सभा व्हावी, 
शासनाच्या योजना लोकापर्यंत पोचवण्यास प्रयत्न करणे, गावामध्ये पीक लागवडीसंदर्भातील नियोजन करणे, कमी पर्जन्याच्या ठिकाणी उत्पादन 
वाढीस प्रयत्न करणे, शेतीपूरक व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करणे, 
पीक काढणीसंदर्भातील तंत्रज्ञान आवगत करणे, पिकांच्या विक्रीसाठीच्या बाजारपेठांची माहिती ठेवणे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

Ashes Series : २६२ धावा, २० विकेट्स! AUS vs ENG चौथ्या कसोटीत गोलंदाजांची हवा, स्टीव्ह स्मिथचा 'झापूक झूपूक' चेंडूवर दांडा गुल Video

College Student Accident: जिवलग मैत्रिणी रोजचा गाडीवरचा प्रवास, पण आजचा दिवस असा येईल वाटलं नव्हतं... भीषण अपघातात दोघींनाही मृत्यूने गाठले

Thane Crime: मानवतेला काळीमा फासणारी घटना! ७ दिवसांचं बाळ ६ लाखांत सौदा अन्...; बालतस्करीचे भयंकर वास्तव समोर

SCROLL FOR NEXT