सातारा

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला 'स्वाभिमानी'चा पाठिंबा

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. 8) पुकारलेल्या "भारत बंद'मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रीय सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील सर्वांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन "स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, दुकानदार, हॉटेल्स, मॉल्स, वाहतूक, शाळा व अन्य उद्योग बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, "उत्तर'चे तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, "दक्षिण'चे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील केले आहे. केंद्र सरकारला व हुकूमशाहीला झुकवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होत मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असेही पत्रकात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : हॉकीला १०० वर्ष पूर्ण; साडेपाचशे जिल्ह्यांत एकाच वेळी चौदाशे स्पर्धांचे आयोजन, क्रीडामंत्र्यांची घोषणा

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT