ad padvi 
उत्तर महाराष्ट्र

जनतेने संचारबंदीचे पालन करावे :ऍड.के.सी.पाडवी

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार, : करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या सीमादेखील प्रशासनाने बंद केल्या आहेत. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे व घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी केले. 

नागरिकांना केलेल्या आवाहनात पालकमंत्री म्हणतात, जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत मनाई आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत जिल्ह्याच्या सर्व सीमा येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. कोणत्याही खाजगी वाहनांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडावे आणि अशा ठिकाणीदेखील गर्दी करू नये. 
गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करू नये. बाहेर पडल्यानंतरही नागरिकांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये. धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील गर्दी करू नये. पुढील 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. आपण घराबाहेर जाणे टाळले तर कोरोना विषाणूची साखळी तोडता येईल आणि जिल्हा कोरोनामुक्त ठेवता येईल. 
बाहेरील देशातून किंवा पुणे-मुंबई येथून आलेल्या प्रवाशांची माहिती प्रशासनास द्यावी व डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला घरात किंवा रुग्णालयात क्वॉरंटाईन करून घ्यावे. व्यक्तीशी संपर्क करताना दोन मीटरचे अंतर ठेवावे. आजाराची लक्षणे दिसताच आरोग्य तपासणी करून घ्यावी. हा आजार विलगीकरणात राहिल्यास बरा होत असल्याने घाबरून न जाता आपल्या आरोग्यासाठी आवश्‍यक खबरदारी घ्यावी. प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांची सुरक्षा अत्यंत महत्वाची असल्याने योग्य खबरदारी घ्यावी. 
नंदुरबारची जनता कोरोना विरुद्धच्या या लढ्यात यशस्वी होईल आणि जिल्हा करोनामुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीदेखील आपत्कालीन परिस्थितीत शासन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

SCROLL FOR NEXT