उत्तर महाराष्ट्र

'युतीमुळे काँग्रेस आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली'

सकाळवृत्तसेवा

नाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, याचे वाटप निश्‍चित झाल्याने काही जागांबाबत कार्यकर्त्यांची मागणी असली, तरी कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे काल दिली. युतीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याने काँग्रेसकडून खोडसाळपणाचे आरोप होत असल्याची टीका त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर केली.

नाशिक दौऱ्यावर आलेले जलसंपदामंत्री महाजन यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा असल्याने युती कायम राहिली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा निर्णय घेतला जाणार आहे. खासदार नारायण राणे यांनी युतीवर टीका केली असली, तरी त्यांचा राग शिवसेना व उद्धव ठाकरेंवर असून, भाजपवर नाही. सध्याच्या दहशतवादी हल्ल्याचा विचार करता देशाला मजबूत सरकारची गरज असल्यानेच भाजप-शिवसेनेची युती होणे काळाची गरज होती. ही बाब राणे यांनी समजून घ्यायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

खडसेंच्या वक्तव्याला पाठिंबा
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री युतीचाच होईल, असे वक्तव्य केले. त्याचे समर्थन श्री. महाजन यांनी केले. किसान सभेच्या मागण्यांची राज्य सरकारने दखल घेत अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मोर्चा न आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

आरोप खोडसाळपणाचे
‘ईडी’ची भीती दाखवून भाजपने शिवसेनेला युती करण्यासाठी भाग पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यावर बोलताना युती होऊ नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु युती झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याची भीती निर्माण झाल्याने खोडसाळपणाचे आरोप होत आहेत. भाजपला सूडबुद्धीचे राजकारण करायचे असते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी लावता आली असती. पण सूडबुद्धीचा भाजपचा स्वभाव नसल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT