उत्तर महाराष्ट्र

"जलयुक्त'च्या कामांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - जलयुक्त शिवार अभियानातील 2016-17 मधील अपूर्णावस्थेतील आणि प्रस्तावित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील गावांना इंधनासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. 

राज्यात या अभियानातंर्गत 2016-17 मध्ये 5,291 गावांची निवड करण्यात आली होती. या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली होती; पण गावातील काही कामे अजूनही अपूर्ण असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने अंतिम मुदतवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. दरम्यान, स्पर्धेतील सहभागी गावांमध्ये मृद व जलसंधारण कामे श्रमदानाद्वारे करावयाची आहेत. अशा गावांना प्रोत्साहन म्हणून यंत्राद्वारे कामे होणाऱ्या गावांना इंधनासाठीचे पैसे 2018-19 मधील निधीतून देण्यात येतील. या अभियानांतर्गत 2015-16 मध्ये 6,202 गावे, 2016-17 मध्ये 5,291 गावे, 2017-18 मध्ये 5,018 गावे निवडण्यात आली. या एकूण गावांपैकी 11 हजारांहून अधिक गावांना पाणी उपलब्ध झाले आहे. 2018-19 मधील कामांसाठी गावांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

Murlidhar Mohol : वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन,कोंडीची समस्या सुटण्यास होणार मदत

SCROLL FOR NEXT