Farmers worried due to low rainfall
Farmers worried due to low rainfall 
उत्तर महाराष्ट्र

कमी पावसामुळे शेतकरी चिंतातूर

जगन्नाथ पाटील

कापडणे (जि.धुळे) : धुळे तालुक्यात पावसाने चिंता वाढविली आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची स्थिती गंभीरच आहे. पिकांना वाढीसाठी जोमदार पावसाची आवश्यकता असतांना केवळ भुरभुर पावसात पिके कशीतरी तग धरुन आहेत. भुरभुर पावसाने शेतकर्‍यांची चिंता वाढविली आहे. चांगल्या पावसाची सार्‍यांनाच प्रतिक्षा आहे.

जोरदार पावसाची प्रतिक्षा

दोन आणि सहा जूनला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने आजूनपर्यंत दांडी मारली आहेत. या पावसामुळे केवळ साठ टक्के शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यात. त्यानंतर तब्बल सोळा दिवसांनंतर पाऊस झाला. शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी 22 जुलैपर्यंत वाट पहावी लागली. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागील आहे. या भुरभूर पावसात पिकांनी तग धरला असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.

ढगाळ वातावरण आरोग्याच्या समस्या

मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सुर्यदर्शनही दुर्मीळ झाले आहे. असे वातावरण आरोग्यासाठी योग्य नसून जिल्ह्यात अनेक ठिकाणी थंडी तापांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे या परिसरात आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील काही अपवादात्माक भाग वगळल्यास पाणी पुरवठ्याची स्थितीही गंभीर होत चालली आहे. पावसाळा सुरु होण्यास महिना उलटला आहे. पाणी टंचाईग्रस्त गावे अद्यापही तहानलेलेच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT