Sakal-Exclusive
Sakal-Exclusive 
उत्तर महाराष्ट्र

विमा कवचाबाबत उदासीनता

सकाळवृत्तसेवा

नाशिक - शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचा ‘राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्याचा शासन निर्णय असतानादेखील अद्याप एकाही विद्यार्थ्याचा ह्या योजनेअंतर्गत विमा उतरविण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

शासकीय वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे म्हणून ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयात वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचा राजीव गांधी विमा योजनेंतर्गत शासनामार्फत विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुणे येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी मदन पथवे यांनी माहितीच्या अधिकारात शैक्षणिक वर्ष २०११-१२ ते २०१८-१९ पर्यंतच्या शैक्षणिक वर्षात विभागामार्फत या योजनेंतर्गत दरवर्षी किती विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यात आलेला आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तालय आणि मंत्रालयीन स्तरावर मागविली होती.

या वेळी मंत्रालयीन स्तरावर आदिवासी विकास विभागाचे अवर सचिव यांनी पथवे यास दिलेल्या माहितीच्या आधारावर मंत्रालयीन स्तरावर अशी कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील वसतिगृहे
४६१ एकूण संख्या
६० हजार क्षमता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT