labors
labors 
उत्तर महाराष्ट्र

75 टक्के असंघटित कामगार राहतात लाभांपासून वंचित

सकाळवृत्तसेवा

नाशिक - असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना लागू असल्या, तरी अटी-शर्तींचे पालन अवघे 25 टक्के कामगारच करीत आहेत. त्यामुळे 75 टक्‍के कामगारांना हक्काच्या लाभांवरही पाणी सोडावे लागत आहे. अटल पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवनज्योत विमा योजना आदी योजमांच्या लाभापासून ते वंचित आहेत.

नाशिक विभागात 69 हजार असंघटित कामगारांनी नोंदणी केली होती. जे कामगार प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या नोंदणीचे दर वर्षी नूतनीकरण करतात त्यांनाच कल्याणकारी योजनांचा फायदा होतो. असे केवळ 17 हजार 502 कामगारच नूतनीकरण करत असल्याचे आढळून आले आहे. आजही कामगार जगतामध्ये 92 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. आठ तासांची ड्यूटी कागदावरच राहिल्याने त्यांना बारा-बारा तास राबावे लागते. भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनेच्या लाभासाठी झगडावे लागते. 20 पेक्षा अधिक कामगार असल्यास कामगार कायदा लागू होतो. मात्र, कामावर दहापेक्षा कमी कामगार ठेवून या कायद्यातून पळवाटा शोधल्या आहेत.

कामगार लेखी तक्रार करत नसल्याने कामगार कायद्यानुसार कारवाई होत नाही. कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी 19 प्रकारच्या लाभाच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र त्यांचा लाभ घेण्यासाठी अटी-शर्तींचे पालन व नूतनीकरण होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT