Crop insurance
Crop insurance Crop insurance
उत्तर महाराष्ट्र

फळ पीकविमा योजनेच्या निकषात सुधारणा

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर (धुळे) : पंतप्रधान फळ पीक योजनेचा (Crop insurance) लाभ देताना विमा कंपन्यांद्वारे लावले जाणारे निकष आणि हवामान धोके यात राज्य शासनाने महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्याचा लाभ राज्यातील लाखो फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सुधारणांसाठी माजी मंत्री (MLA Amrish patel) आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कांशीराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. (shirpur-mla-amrishbhai-patel-farmer-crop-inshurance)

विविध आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकांचा विमा अदा करताना अद्ययावतीकरण आणि बदलत्या वातावरणाचा अभ्यास यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे दावे नाकारले जाऊन संबंधित विमा कंपनीला संपूर्ण फायदा मिळत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. आमदार पटेल, आमदार पावरा व भूपेशभाई पटेल यांनी फळ पीकविमा योजनेतील जाचक अटी-निकष आणि हवामान धोके यांच्यात बदल करावा, अशी मागणी करून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात जनहित याचिकाही दाखल केली असून, विधिज्ञ ॲड. ज्ञानेश्वर बागूल काम पाहत आहेत. याचिकेवरून संबंधित विमा कंपनीसह प्रतिवादींना नोटीसही बजावली आहे. याचिकेचा निकाल प्रलंबित आहे.

शासनाने जाहीर केलेल्या निकषांची पडताळणी के. डी. पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, प्रकाश गुजर (घोडसगाव), जे. टी. पाटील (भाटपुरा), ॲड. प्रताप पाटील, योगेश बोरसे, अविनाश गुजर, अविनाश पाटील, दर्यावसिंग जाधव, हुकूमचंद पाटील आदींनी करून सुधारण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.

सुधारित निकष असे

आमदार पटेल, आमदार पावरा व भूपेशभाई पटेल यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाने २०२१- २२, २०२२- २३ व २०२३- २४ या तीन वर्षांसाठी फळ पीकविमा योजनेचे सुधारित निकष जाहीर केले. केळी प्रमुख फळ पीक असलेल्या २७ जिल्ह्यांत अंबिया बहारात हवामान धोक्यांचे सुधारित निकष आणि नुकसानभरपाईची तरतूद अशी : १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस किमान तापमान आठ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास कमाल २६ हजार ५०० रुपये, १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान ४० किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहिल्याची नोंद संबंधित हवामान केंद्रात झाल्यास कमाल ७० हजार रुपये, १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास ३५ हजार रुपये, १ मे ते ३१ मेदरम्यान सतत पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास ४३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देय असेल, १ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान गारपीट झाल्यास संबंधित विमाधारकाला ४६ हजार ६६७ रुपये नुकसानभरपाई देय असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT