bambu kangi 
उत्तर महाराष्ट्र

धान्य साठवणूकीसाठी उत्‍तम पर्याय; बांबूपासून तयार होणारी कणगी, आदिवासींच्या उद्योगाला चालना

जसपाल वळवी

वाण्याविहिर (नंदुरबार) : अतिदुर्गम सातपुडा पर्वत रांगातील मोलगी परिसरातील शेतकऱ्यांना बांबूपासून तयार होणाऱ्या धान्य साठवून ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कणगी तयार करण्याचा उद्योग-व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे 

धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम ठेवणे खुप जिकरीचे असते. शेतकरी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या किंवा वेताच्या टोपलीला बाहेरून शेण किंवा मातीचा थर लावतो. त्यामुळे त्‍याचे छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किड्यांपासून धान्याचे संरक्षण होते. यातील एक प्रकार म्‍हणजे बांबूपासून बनणारी कणगी.

‘कणगी’चा आधार
सातपुडा पर्वतरांगांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात स्थलांतर करणे हा या भागातील खूप मोठा प्रश्न असला तरी मोलगी परिसरातील काही गावामधील शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त जोड व्यवसाय म्हणून कणगी व्यवसायाचा आधार आहे. परिसरातील बालाघाट, देवबारी, खोडजबार, दुधलीपादर, जुगलखेत, बोरीखासाड बिजरीगव्हाण, बर्डी या भागात ‘कणगी’ (धान्य साठवून ठेवण्याची बांबूपासून तयार करण्यात येणारी कोठी) व्यवसायासाठी तयार केल्या जातात आणि शेतकऱ्यांना मोलगी हे बाजारपेठ विक्रीसाठी खूप चांगले असल्यामुळे त्याची विक्री ही चार ते पाच हजार रुपयापर्यंत होते.

पंचवीस वर्ष धान्य टिकते
कणगीचा उपयोग आदिवासी बांधव पूर्वीपासून आपले धान्य साठवून ठेवण्यासाठी करतात. यामध्ये शेतकरी 20 ते 25 वर्षापर्यंतचे धान्य साठवून ठेवू शकतो. आजही आदिवासी भागात खूप जुन्या कणग्या शेतकऱ्यांनी आपल्या माळ्यावर ठेवलेल्या आढळतात. आदिवासी बहुल भागात जंगलतोड झाली असली तरी आता या भागातील लोकांनी जंगलाचे महत्व जाणून त्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर व रिकाम्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे व बांबू लागवड केल्याने या बांबूचा उपयोग आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होत आहे.

जोड व्यवसायाने स्‍थलांतर कमी
शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकुटपालन, शेळीपालन या व्यवसायाबरोबरच आता कणगी व्यवसाय ही उदयास येत आहे. शेतकरी प्रामुख्याने कणगी, टोपल्या, झाडू, घरासाठी, शेतीसाठी लागणारी विविध अवजारे ही बांबूपासून बनवतात. त्यामुळे बांबूपासून तयार होणारा कणगी व्यवसाय हा या भागातील शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे. अशा लहानमोठ्या व्यवसायामुळे या भागातील होणारे स्थलांतर बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT